Monday, May 12, 2025
महाराष्ट्रराज्य

धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 15 हजारांचा बोनस जाहीर, विधानसभेत मुख्यमंत्री शिंदेंनी ही घोषणा

मुम्बई वृत्तसेवा, दींनाक : 29 डिसेंबर 2022 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधिमंडळात विदर्भासाठी काही महत्वाच्या घोषणा केल्या. धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 15 हजारांचा बोनस जाहीर केला आहे. आज विधानसभेत मुख्यमंत्री शिंदेंनी ही घोषणा केली. पाच लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांच्या थेट अकाऊंटला रक्कम पाठवली जाणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, विदर्भ मजबूत तर राज्य मजबूत आहे. तसं महाराष्ट्राच्या विकासासाठी विदर्भ महत्वाचा आहे. समृद्धी महामार्गामुळे मुंबई जवळ आणली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई आणि नागपूरला जवळ आणण्याचं काम केलं आहे. समृध्दीच्या वेळी आमच्याही आमदारांना विरोध करायला लावला. जमिनी देऊ नका म्हणून सांगण्यात आलं. समृध्दीमुळे सगळ्यांची समृध्दी झाली, असं मुख्यमंत्री म्हणाले.

विदर्भातील राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ सिंदखेडराजा आणि लोणार सरोवर पर्यटन विकास आराखड्यानुसार कामं सुरु आहेत
बुलढाणा जिल्ह्यातील अरकचेरी आणि आलेवाडी बृहत लघु पाटबंधारे प्रकल्पांना सुधारित मान्यता, यामुळे सुमारे 1918 हेक्टर जमिनीला सिंचनाचा फायदा होईल.लोणार सरोवराच्या पर्यटनाच्यादृष्टीने विकास करण्यासाठी 369 कोटी 78 लाख रुपयांच्या विकास आराखड्यास मंजुरी. गोसीखुर्द येथे 100 एकर जागेवर जागतिक दर्जाचा जल पर्यटन प्रकल्प उभारणार आहोत. यासाठी जागतिक निविदा मागवण्यात येणार असून, पीपीपी तत्वावर काम करण्यात येईल. लवकरच सामंजस्य करार करण्यात येईल. निधीची तरतूद देखील करण्यात येत आहे.

गडचिरोली जिल्ह्यात 20 हजार कोटी गुंतवणुकीचा खनीज उत्खनन प्रकल्प सुरू होईल. सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी 755 कोटी रुपये निधी वितरित. अमरावती, नागपूर पुणे विभागातील 14 जिल्ह्यांतील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 222 कोटी 32 लाख रुपये वितरित विदर्भ, मराठवाडामधील औद्योगिक विकासाला चालना. 70 हजार कोटीच्या रुपयांच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता. त्यापैकी विदर्भामध्ये एकूण 44 हजार 123 कोटी रुपयांची गुंतवणूक. 45 हजार रोजगार निर्मिती होणार नागपूर मेट्रो रेल प्रकल्प टप्पा-1 ला सुधारित 9279 कोटींच्या सुधारित खर्चास मान्यता मिळाली आहे. वडसा देसाईगंज-गडचिरोली नवीन रेल्वे मार्गासाठी 1 हजार 96 कोटी इतक्या सुधारित खर्चास मान्यता. त्यानुसार 548 कोटी राज्य शासनाचा हिस्सा आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 15 हजारांचा बोनस जाहीर

मुख्यमंत्री म्हणाले की, समृद्धी महामार्गामुळे केवळ वाहनांची ये-जा सुरु झालेला नाही. तर याचाच उपयोग करून घेऊन आम्ही विदर्भ-मराठवाडा टुरिझम सर्किट तयार करणार आहोत. एरव्ही संभाजीनगरहून नागपूर- अमरावती किंवा अगदी गडचिरोलीपर्यंत पोहोचण्यासाठी भरपूर वेळ लागायचा. विदर्भाचं म्हणून एक वेगळेपण आहे. खनीज, उर्जा, पाणी,वन, शेती ही विदर्भाची बलस्थानं आहेत. येणाऱ्या काळात उद्योग आणि पर्यटन क्षेत्रात विदर्भात क्रांती झालेली आपण पाहाल. याची सुरुवात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून झाली आहे, असं ते म्हणाले.

error: Content is protected !!