समाजातील शेवटचा घटक हा न्यायापासुन वंचित राहु नये— माननिय न्यायमूर्ती नितीन एम. जामदार,वरिष्ठ प्रशासकिय न्यायमूर्ती, उच्च न्यायालय
गोंदिया – न्याय म्हणजे काय किंवा अन्याय झाला तर कुठे जायचे एवढी जरी माहिती मिळाली तरी न्यायाच्या दिशेने वाटचाल सुरू होते. आपल्या देशामध्ये संविधान आल्यानंतर समजातील ब-याच घटकांना आपले हक्क काय आहेत याची माहिती नव्हती, त्यामुळे संविधानामध्ये सुधार करून आर्टिकल ३९–अ आणला गेला. यामध्ये मोफत आणि सक्षम न्याय मिळविण्याचा अधिकार सर्वांना प्राप्त झाला. ज्यामुळे आजच्या महाशिबिर हा न्यायाची वाटचाल करण्याचा अत्यंत महत्वाचा एक पाउल आहे.
समाजातील पिडीत व्यक्तींसाठी सरकार विविध योजना राबवितो परंतु जोपर्यंत त्यांना माहित नसणार तोपर्यंत त्या सर्व योजना कागदावरच असतात. त्यामुळे अशा प्रकारच्या जनजागृती शिबीरा मार्फत प्राथमिक माहिती पुरविण्याचा प्रयत्न केला जातो असे उद्गार माननिय न्यायमूर्ती, श्री नितीन एम. जामदार,वरिष्ठ प्रशासकिय न्यायमूर्ती उच्च न्यायालय, मुंबई यांनी दिनांक १४.०९.२०२४ रोजी पवार सांस्कृतिक भवन, गोंदिया येथे विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा तसेच कायदेशीर मदत संरक्षण सल्लागार प्रणाली कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.
माननिय राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय,नवी दिल्ली व माननिय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकारण, उच्चन्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,गोंदिया, जिल्हा न्यायालय, गोंदिया व जिल्हा प्रशासन, गोंदिया यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक १४.०९.२०२४ रोजी पवार सांस्कृतिक भवन, गोंदिया येथे विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा आयोजन करण्यात आला. सदर मेळाव्याचे उद्घाटन माननिय न्यायमूर्ती श्री नितीन एम. जामदार, वरिष्ठ प्रशासकिय न्यायमूर्ती, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या शुभहस्ते झाले.
त्याप्रसंगी माननिय न्यायमूर्ती श्री नितीन डब्ल्यू. सांबरे, वरिष्ठ न्यायमूर्ती, उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीठ नागपूर व माननिय न्यायमूर्ती श्री महेंद्र डब्ल्यू. चांदवाणी, उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीठ नागपूर, तथा पालक न्यायमूर्ती न्यायीक जिल्हा गोंदिया हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमापूर्वी मान्यवरांनी कायदेशीर मदत संरक्षण सल्लागार प्रणाली कार्यालयाचे गोंदिया न्यायालय परिसरामध्ये उद्घाटन केले. मेळाव्यास माननिय श्री समीर एस. अडकर, सदस्य सचिव,महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांची सन्माननीय उपस्थिती होती. तसेच माननिय जिल्हाधिकारी श्री प्रजित नायर,गोंदिया, माननिय पोलिस अधिक्षक, गोंदिया श्री. गोरख भामरे,माननिय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मुरूगानंथम एम. जिल्हापरिषद गोंदिया, श्री. तुषार ढमढेरे, विभागीय वनाधिकारी, सामाजिक वनीकरण, गोंदिया इतर शासकीय विभागांचे अधिकारी आणि गोंदिया जिल्हातील सर्व न्यायीक अधिकारी उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत जाम्यातिम्या विद्यालय गोरेगांव येथील शालेय विद्यार्थ्यांनी स्वागत गीताने केली. त्यानंतर मान्यवरांनी विविध शासकीय विभागांच्या स्टॉलचे उद्घाटन केले.
कार्यक्रमा दरम्यान मा. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे गीत लावण्यात आले. कार्यक्रमाचा शुभारंभ विचारपिठावरील उपस्थित मान्यवरांनी रोपट्यांना जल देवून केला. कार्यक्रमामध्ये शालेय विदयार्थ्यांनी स्वागत गीत गायले व सांस्कृतिक नृत्य केले. सन्माननीय न्यायमूर्तींचा व इतर मान्यवरांचा सत्कार न्यायीक अधिकारी व वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केला. प्रास्ताविक भाषणात मा. श्री अरविंद टि. वानखेडे, प्रमुख जिल्हा वसत्र न्यायाधीश, गोंदिया तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,गोंदिया यांनी विधी सेवा व शासकीय महाशिबीर आयोजना मागील उद्देश उपस्थितांना सांगितला व विधी सेवा प्राधिकरणा मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली.
तसेच त्यांनी ‘न्यायसर्वांसाठी’ हे विधी सेवा प्राधिकरणाचे घोषवाक्य आहे असे सांगीतले. राष्ट्रीय स्तरापासुन ते तालुका स्तरापर्यत विधी सेवा प्राधिकरण समितीची स्थापना करण्यात आली आहे असे सांगीतले. समाजातील कोणतीही व्यक्ती किंवा घटक न्यायापासुन वंचित राहु नये हा भारतीय संविधानाचा मुळ उद्येश आहे असे सांगीतले. प्रजीत नायर, जिल्हाधिकारी, गोंदिया यांनी त्यांच्या भाषणामध्ये नागरीकांनी महामेळाव्यातील विविध शासकिय योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. मा. न्यायमूर्तीश्री महेंद्र डब्ल्यू. चांदवाणी, उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीठ नागपूर व पालक न्यायमूर्ती न्यायीक जिल्हा गोंदिया यांनी सर्व उपस्थितांना सामाजिक न्याय योजना, कृषी योजना, बचत गट योजना इत्यादी शासकिय योजनांचा लाभ घेवून स्वत:चा विकास करून घ्यावा,जिवनमान सुधारावे व मुख्य प्रवाहात यावे असे आवाहन केले.
मा. न्यायमूर्ती श्री नितीन डब्ल्यू. सांबरे, वरिष्ठ न्यायमूर्ती, उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीठ नागपूर, यांनी शासनाच्या विविध योजनांबाबत नागरीकांना माहिती दिली. तसेच त्यांनी दिव्यांग जोडप्यांना प्रत्येकी ५०,०००/- रूपयाचे धनादेशाद्वारे अर्थसहाय्य देउन सत्कार केला. तसेच त्यांनी गोंदिया जिल्यामध्ये आढळणा-या सारस पक्षांचे संरक्षण करण्यासंबंधी शेतक-यांना मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे माननिय न्यायमुर्ती श्री नितीन एम. जामदार, वरिष्ठ न्यायमूर्ती उच्च न्यायालय, मुंबई यांचे हस्ते दोन दिव्यांग लाभार्थ्यां नागॅझेटचे वाटप आणि तीन दिव्यांग लाभार्थ्यांना यु.डि.आय.डी.(UDID) कार्ड तसेच दिव्यांग लाभार्थ्यांना प्रमाणपत्र आणि शालेय अंध विद्यार्थ्यांना Dozy Mobile चे वितरण केले.
मान्यवरांनी सर्वस्टॉलची पाहणी केली. सदर कार्यक्रमाचा मुख्य हेतू कायदया बाबतची माहिती नागरिकांना व्हावी आणि शासनाच्या विविध योजनांचा प्रचार / प्रसार व्हावा, असा होता. कार्यक्रमासाठी जिल्हयाच्या विविध भागातून बहुसंख्येने नागरीक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये सर्व तालुक्यातील वकील संघाचे पदाधिकारी व सदस्य हजर होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती प्राजक्ता ढाणे व श्रीमती तेजश्री गवई, न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग,गोंदिया यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन श्री एन. के. वाळके,सदस्य, विधी सेवा प्राधिकरण, गोंदिया यांनी केले.कार्यक्रमामध्ये जिल्हा वकिल संघाचे अध्यक्ष श्री. टि.बी. कटरे, सचिव श्री. आर.ओ. कटरे, उपाध्यक्ष मेघा राहांगडाले तसेच सर्व तालुका वकिल संघाचे अध्यक्ष, तसेच वरीष्ठ वकिल सर्वश्री. ओ. जी. मेठी, श्री. पी. सी. चव्हाण इत्यादी हजर होते.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मा. श्री. ए. एस.प्रतिनिधी, जिल्हा न्यायाधीश – १, मा. एम. टी. आसिम जिल्हान्यायाधीश–२, मा. श्री. एन. डी. खोसे, जिल्हा न्यायाधीश – ३,गोंदिया, मा. श्री. एस. आर. मोकाशी, सह दिवाणी न्यायाधीश,वरिष्ठ स्तर, गोंदिया, मा. श्री. वाय. जे. तांबोळी, ४ थे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, गोंदिया आणि सर्व न्यायीक अधिकारी वर्ग,श्री. पी. पी. पांडे प्रबंधक, जिल्हा न्यायालय, गोंदिया, जिल्हा विधीसेवा प्राधिकरण, गोंदियाचे कर्मचारी व इतर सर्व न्यायीक कर्मचारी इत्यांदिनी अथक परिश्रम घेतले. सदरचा महामेळावा माननिय श्री अरविंद टि. वानखेडे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, गोंदिया तथाअध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गोंदिया यांच्या अध्यक्षते खाली यशस्वी रीत्या संपन्न झाला.