सडक अर्जुनी शहर झाला घामाघूम, पारा ४४ अंशांवर
सुशिल लाडे….
सडक अर्जुनी : मे महिन्याच्या अखेरीस उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून सडक अर्जुनी शहर अक्षरशः घामाघूम झाले आहे. आज २२ में ला शुक्रवारी दुपारच्या सुमारास तापमानाचा पारा तब्बल ४४ अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने नागरिक हैराण झाले. सकाळपासूनच उन्हाचा तडाखा जाणवत होता, तर दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला.


प्रशासनाने नागरिकांना दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे तसेच डोक्यावर टोपी किंवा कापड वापरण्याचा सल्ला दिला आहे. विशेष करून लहान मुले, वृद्ध नागरिक यांची काळजी घ्यावी. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस नवतपा लागणार असून उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.
